Header Ads Widget


या कारणामुळे राशन कार्ड होणार बंद : अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी - गणेश मिसाळ

प्रतिनिधी - सईद कुरेशी : नंदुरबार जिल्ह्यातील सर्व अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांनी आपल्या रास्तभाव दुकानातून ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.  

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानामार्फत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात येत असून शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील एकूण 12 लाख 32 हजार 764 लाभार्थ्यांचे e-KYC (लाभार्थी प्रमाणीकरण) करणे बंधनकारक आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकेसोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे तसेच शिधापत्रिकेमध्ये नमुद असलेल्या व्यक्ती त्याच आहेत याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली असून त्याव्दारे आधार क्रमांक संलग्न शिधापत्रिकेमध्ये नमुद योग्य व्यक्ती असल्याची खात्री होईल. 

e-KYC जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानामार्फत तेथील ई-पॉस मशीनद्वारे केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांनी आपल्या रास्तभाव दुकानातून ई-केवायसी करून घ्यावी, असेही श्री. मिसाळ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

e- KYC केवायसी नाही केल्यातर राशन कार्ड बंद होऊ शकते..

Post a Comment

0 Comments

|