Header Ads Widget


मतदान ओळखपत्र नसल्यास इतर पुरावे ग्राह्य धरणार मनीषा खत्री


प्रतिनिधी नंदुरबार- दिनांक 15 एप्रिल 2024 (जिमाका वृत्त) 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान करताना मतदाराची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक असून मतदार ओळखपत्र नसल्यास इतर बारा पुरावे ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

मतदार ओळखपत्र नसल्यास हे कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरणार..

• आधारकार्ड.

• मनरेगा अंतर्गत निर्गमित जॉब कार्ड.

• बँक किंवा पोस्ट ऑफीसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक.

• कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड.

• वाहन चालक परवाना.

• पॅनकार्ड.

• राष्ट्रीय जनरल ऑफ इंडिया यांचेद्वादा नॅशनल पॉप्युलेशन रजिष्टर अंतर्गत निर्गमित  स्मार्टकार्ड.

• भारतीय पासपोर्ट.

• फोटोसह पेन्शन दस्तऐवज

• केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक लिमिटेड कूपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र.

• खासदार, आमदार यांना देण्यात आलेले ओळखपत्र यांचे अधिकृत ओळखपत्र व 

• भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांग प्रमाणपत्र

यापैकी कोणताही एक पुरावा मतदान करतांना ग्राह्य धरण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती खत्री यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

0 Comments

|