कार्यकारी संचालक जुनैद अहेमद : डॉ..वर्षा लहाडे जिल्हा शल्यचिकित्सक नंदूरबार यांच्या एकाधिकार, गैरवर्तणूक व भ्रष्टाचाराची सखोल होऊन तात्काळ जिल्हा बदली करा,या मागणीसाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, बिरसा फायटर्स, बिरसा आर्मी ,विश्व आदिवासी सेवा संघटना आदि आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर आज दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात आले .या आंदोलनात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे राज्य उपाध्यक्ष रोहीदास वळवी ,बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे नंदूरबार जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,उपजिल्हाध्यक्ष लालसिंग तडवी,किसन वसावे, लालसिंग पाडवी, बिरसा फायटर्सचे वनसिंग पटले, हान्या वसावे,बिरसा आर्मीचे नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी,धडगांव तालुकाध्यक्ष अजय वळवी, आरोग्य विभागाचे डाॅक्टर, परिचारिका,कंत्राटी कर्मचारी इत्यादी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
मागणीचे निवेदन माणिकराव कोकाटे ,कृषी मंत्री तथा पालकमंत्री जिल्हा नंदूरबार यांना देण्यात आले व पालकमंत्र्यासमोर तक्रारींचा पाढा वाचून दाखवला.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ..वर्षा लहाडे यांच्या आस्थापना अंतर्गत कायमस्वरूपी व कंत्राटी अधिकारी ,कर्मचारी यांच्याकडून वेतन करणे,नूतनीकरण करणे,पोस्टिंग, प्रतिनियुक्ती रद्द करणे,पदोन्नती करणे,रजा मंजूर करणे, वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठवणे,गोपनीय अहवाल, जी.पी.एफ.काढणे इत्यादी सारख्या अनेक प्रशासकीय तसेच इतर कामासाठी आर्थिक मागणी करणे.एन आर एच एम व नवीन पदभरती आणि तदर्थ पदभरती करण्यासाठी निवड समितीला डावलून एकतर्फी आर्थिक देवाण घेवाण करून भरती प्रक्रिया राबविणे.वार्षिक पेटी सप्लाय स्टेशनरी कोणतीही मागणी नसताना देखील निष्कृष्ट दर्जाची स्टेशनरी खरेदी करून ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालय येथे पुरवठा करणे.डॉक्टर वर्षा लहाडे यांच्यावर स्त्री भ्रूण हत्यासारखा गंभीर गुन्हा दाखल असून त्यांच्यावर आय पी सी कलम ४६८,४७१,४२०,१७७,१७८,१८६ अंतर्गत गुन्हा दाखल असून त्यांना नंदूरबार सारख्या आदिवासी बहूल जिल्ह्य़ात जिल्हा शल्यचिकित्सक पदावर नियुक्ती का देण्यात आली? त्यांना तात्काळ नंदूरबार जिल्ह्य़ातून हकालपट्टी करा,अशी मागणी आदिवासी संघटनांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.
या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे करायचे काय? खाली डोक वर पाय? डॉ..वर्षा लहाडें यांची जिल्हय़ातून हकालपट्टी झालीच पाहिजे,डॉ..वर्षा लहाडे चले जाव,भ्रष्ट अधिकारी चले जाव,भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे,सरकार हमसे डरती है,पुलीस को आगे करती है!अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
0 Comments