Header Ads Widget


शहादा येथे शांती विहार नगर मध्ये दिनांक १९ मे पासून श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन..

 

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथे डोंगरगाव रस्त्यावरील शांती विहार नगर मध्ये दिनांक १९ मे पासून श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.भागवतकार नंदुरबार येथील अविनाश जोशी हे असून पूर्ण सप्ताह कथेची निरूपण करणार आहेत.२५ मे रोजी भागवत कथेच्या समारोप होईल.

.त्यादिवशी महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.१९ मे रोजी सकाळी सजवलेल्या रथावर भागवत कथा ग्रंथाची कलश यात्रा काढण्यात येणार आहे.सप्ताहात २३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता कृष्णजन्म कार्यक्रम देखील आयोजित केला जाणार आहे.रोज दुपारी तीन ते सहा वाजेला भागवताचार्य अविनाश जोशी कथेची निरूपण करणार आहेत.भागवत कथा स्वतःचे आयोजन काशिनाथ पाटील यांनी केले असून नितीन चौधरी उमेश चौधरी शांती विहार नगर हरी ओम नगर व महावीर नगर परिसरातील भाविक सहकार्य करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

|