Header Ads Widget


बादशहा खाऊ देईना…..आणी …राणी झोपू देईना अशी स्थिती सध्या नांदेड जिल्ह्यात झुगाराच्या नादी लागून-बादशहा पवन

अँप मार्फत वजिराबाद याथून पवन नावाचा वेक्ती मराठवाड्यात जुगार चालवितो असी माहिती आहे ( लुडो, तीन पत्ती, रम्मी, असे अनेक अँप तयार आहेत)

नांदेड:- नांदेड जिल्ह्यात शहरात गेल्या आनेक दिवसापासुन खुलेआम चालु असलेला कल्याण- मुंबई मटक्याने शहरात मोठ्या प्रमाणात जोर धरून धुमाकुळ घातला आहे. कष्ट न करता झटपट श्रीमंत होण्याच्या नादात शहरातील तरूण व युवा वर्ग या वाममार्गाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसुन येत आहे. या अवैद्य झुगार मटक्याच्या नादी लागुन आनेकांचे प्रपंच उघड्यावर येवुन पडल्याचे चित्र शहरात आनेक ठीकाणी पहायला मिळत आहे. तर मटका बुकी मालक व झुगार क्लब मालक मात्र गबरगंड झाल्याचेही चित्र पहायला मिळत आहे.

बादशहा खाऊ देईना…..आणी …राणी झोपू देईना अशी स्थिती सध्या शहरातील झुगाराच्या नादी लागुन व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्या आनेक तरूण व युवक वर्गाची झालेली पहायला मिळत आहे. या मटका झुगाराच्या नादी लागुन आनेकांनी आपले अख्खे प्रपंच उधवस्त करून घेतले आसुन, कर्जबाजारी होऊन दारू, गांजा, चरस या सारख्या व्यसनांच्या आहारी गेले आहेत. शहरातील बहुतांश युवक व तरून वर्ग बरबादीकडे वळताना दीसत आहे. तर झुगार, मटक्याच्या नादात कर्जबाजारी होउन कित्तेक जणांवर गाव सोडून जाण्याची पाळी आली आहे. आनेक तरूण गाव सोडून गेल्याच्या घटना वारंवार घडत असल्याची चर्चा गावपातळीवर आनेकदा ऐकावयास मीळत आहे.
ओपन खाऊ देईना……क्लोज झोपू देईना….अशी अवस्था सध्या नांदेड जिल्ह्यात व शहरातील झुगार मटक्याच्या आहारी गेलेल्या सर्वसामान्य व विशेष करून तरूण युवा वर्गाची झाली आसुन कर्जबाजारी पणामुळे आनेकांचे प्रपंच उधवस्त झाल्याचे चीत्र आहे. झुगार क्लब मालक व मटका बुकी मालक मालामाल, तर सर्वसामान्य व तरूण युवक मटक्याच्या व्यसनामुळे कर्जबाजारी होऊन बेहाल झाले असल्याची अवस्था सर्वत्र पहायला मिळत आहे. या झुगार मटक्याला खुले आम चालविण्यासाठी अभय कोणाचे…? हा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. जर जनतेचे रक्षकच भक्षक बनायला लागले तर सर्वसामान्य जनतेने विश्वास ठेवायचा कोणावर…? असा प्रश्न सध्या इंदापुरकरांना पडला आहे. कुंपणच शेत खात असल्याने याबाबत तक्रार करायची कुणाकडे..? हाच प्रश्न सर्वसामान्य नागरीकाला सध्या सतावत आहे.
शहरातील पानटपरी, खासगी मालकीचे गाळे, नगरपरिषदेच्या मालकीचे गाळे, हाॅटेल, व इतर ठिकाणी खुलेआम मटका बुकी चालू आहेत. तर शहरातील आनेक ठीकाणी मध्यवस्तीत झुगाराचे क्लब दीवस रात्र चालु आहेत. यामध्ये दीवसाला लाखो रूपयांची अवैद्य उलाढाल होत आहे. परंतु हे अवैद्य व्यवसाय नांदेड जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक पोलिसांच्या नजरेस अजिबात पडत नाहीत. व त्याकडे त्यांचे तसुरभर सुध्धा लक्ष जात नाही. एखाद्याने या विषयी तक्रार केली तर त्यालाच उलट्या चौकशीला सामोरे जावे लागत असल्याने सर्वसामाण्य नागरीक या विषयापासुन चार हात लांब राहणेच पसंद करत आहेत. या झंजाटात पडायलाच नको असे म्हणून कित्येकजण गप्प बसने पसंत करत आहेत.

अवैध धंद्याविरोधात कारवाईबाबत पोलीस खात्याची भुमिका संशयास्पद असल्याने जनतेने भरवसा ठेवायचा कोणावर..? असा सुर सध्या नागरिकांमधून निघत आहे. पोलिसांनी मनावर घेतल्यास एक तासात नांदेड शहरातील सर्व अवैद्य धंदे हद्दपार होऊ शकतील. परंतु कडक कारवाईची भुमिका पोलिस खात्याने स्विकारने गरजेचे आहे. त्या विषयी पोलिसखाते ठाम असणे गरजेचे आहे. परंतु पोलिस खात्याकडुन अशा अवैध धंदेवाल्यावर कारवाई का केली जात नाही…? पोलिस खाते सुद्धा या दोन नंबर मटका, झुगार क्लबवाल्यांना घाबरत आहे की काय..? अशी चर्चा सध्या गावभर रंगत आसुन नक्की कुणाच्या आशिर्वादाने हे काळे धंदे सुरू आहेत याचा उलगडा जनतेला होणे गरजेचे आहे.

या अवैध धंद्यामुळे शहरातील गुंडागर्दी पुन्हा मोठ्या प्रमाणात शहरात फोफावण्यास सुरूवात झालेली आहे. शहरातील वाढती गुंडागर्दी ही शहरवासीयांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार असल्याने अशा या अवैध व्यवसायाला खुलेआम पाठबळ कुणाचे…? कुणाच्या आशिर्वादाने हे अवैध धंदे नांदेड जिल्ह्यात व शहरात खुलेआम व राजरोसपपणे चालु आहेत…? यांच्या मागचे बोलविते धणी कोण आहेत…? याची सखोल चौकशी वरीष्ठ स्तरावरून होणे गरजेचे असल्याने स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवुन नांदेड उपविभागीय पोलास अधीकारी कार्यालय व ईतर किंवा पोलिस अधिक्षक कार्यालय, नांदेड यांचे पथकामार्फत कारवाईचा फार्स आवळल्यास नांदेड जिल्ह्यात व शहरातील अवैध व्यवसायाला कायमचा लगाम बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या अवैध व्यवसायाला मोठा राजाश्रय असल्याशिवाय हे असे धंदे शहरात फोफावणे शक्य नाही. आपली राजकीय पोळी भाजुन घेण्यासाठीच काही राजकीय पुढारी चार दोन गाव गुंडाना हाताशी धरून आनेकांना वाम मार्गाला लावण्याचे काम करत असून अशा राजकीय पुढार्‍यांवर पोलिसांचा कायमचा अंकुश असणे गरजेचे आहे. जेणे करून नांदेड जिल्ह्यात व गावात शांतता व सुव्यवस्था राखणे शक्य होईल. व शहरामध्ये शांततामय वातावरण राहील. आणी शहरातील युवा वर्ग अवैध वाममार्गाला लागण्यापेक्षा चांगल्या मार्गाने व्यवसायाच्या नादी लागेल. व गावात शांतता नांदेल. पवन सोमाणी, अनवर, जावेद, असे अनेक लोक आहेत.

Post a Comment

0 Comments

|